15 वे वित्त आयोगाच्या निधी पासून
मूल नगर पालिका दोन वर्षांपासून वंचित
शासनाचे दुर्लक्ष , पाणी पुरवठयावर परिणाम
मूल :- (विनायक रेकलवार)
येथील नगर पालिकेला दोन वर्षांपासून 15 वे वित्त आयोगाचा निधी मिळाला नाही.त्यामुळे पालिका अंतर्गत पाणी पुरवठयाची ,आरोग्य विभागाची आणि इतर कामे ठप्प पडली आहे.त्याचा परिणाम शहराच्या पाणी पुरवठयावर होत आहे.याकडे शासनाचे आणि जिल्हयाच्या पालकमंत्र्यांचे दुर्लक्ष होत आहे. नगर पालिका या स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये मोडतात.शहराच्या विकासासाठी शासनातर्फे नगर पालिकांना वेगवेगळया मथळया खाली वेगवेगळा विकास निधी दिल्या जातो. जिल्हा वार्षिक योजना,वित्त आयोग,विशेष निधी,वैशिष्टपूर्ण योजना या योजनेतून मिळणा-या निधी मुळे नगर पालिका सबळ बनतात.शहराचा विकास केला जातो. मात्र, मूल नगर पालिकेला सन 2021-2022 मध्ये 22 मार्च 2022 रोजी एकदाच 15 वे वित्त आयोगाचा 23.74 लक्ष रूपये निधी मिळाला.त्यांनतर 2023 आणि 2024 सत्रासाठी निधीच मिळाला नाही.मागिल दोन वर्षापासून मूल नगर पालिका 15 वे वित्त आयोगाच्या निधी पासून वंचित आहे. निधी अभावी मूल नगर पालिकेची पाणी पुरवठा विभागाची,आरोग्य विभागाची आणि घनकच-याची कामे ठप्प झाली आहे.निधी नसल्याने घनकच-याची कामे रेंगाळली आहेत.तसेच पाणी पुरवठयाच्या दुरूस्तीवर सुदधा परिणाम होत आहे. पावसाळयाचे दिवस असल्याने शहरातील वातावरण शुदध राखण्यासाठी सुदधा निधीची चणचण भासू लागली आहे. 14 वे वित्त आयोगाचा निधी नगर पालिकेला व्यवस्थित मिळत होता.मात्र 15 वे वित्त आयोगाच्या निधीला कोणते ग्रहण लागले ?हा विषयी पालिका वर्तूळात चर्चा रंगत आहे.2020 मध्ये 15 वे वित्त आयोगाला सुरूवात झाली.एका वर्षात दोन वेळा या आयोगाचा निधी मिळण्याची तरतूद आहे.असे असतानाही कोणत्या कारणामुळे 15 वे वित्त आयोगाचा निधी थांबवून ठेवला असे अनुत्तरीत आहे. शहरातील पाणी पुरवठा सुरूळीत चालविण्यासाठी आणि त्यावरचा खर्च भागविण्यासाठी जनतेकडून नळ कर आकारला जातो.मूल नगर पालिकेची करापोटी 84.67 लक्ष रूप्यांची एकूण मागणी आहे. त्यापैकी फक्त 62.08 लाख रूप्ये वसूल झाल्याचे बोलल्या जाते. 25 टक्के पाणी पुरवठा कर अजूनही बाकी असल्याचे सांगण्यात येते.दुसरीकडे शासनाच्या निधी साठी वाट पाहावी लागत आहे. याकडे शासनाचे मोठी उदासिनता आणि दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.जिल्हयाचे पालकमंत्री यांचेही मूल नगर पालिकेकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
मूल नगर पालिका दोन वर्षांपासून वंचित
शासनाचे दुर्लक्ष , पाणी पुरवठयावर परिणाम
मूल :- (विनायक रेकलवार)
येथील नगर पालिकेला दोन वर्षांपासून 15 वे वित्त आयोगाचा निधी मिळाला नाही.त्यामुळे पालिका अंतर्गत पाणी पुरवठयाची ,आरोग्य विभागाची आणि इतर कामे ठप्प पडली आहे.त्याचा परिणाम शहराच्या पाणी पुरवठयावर होत आहे.याकडे शासनाचे आणि जिल्हयाच्या पालकमंत्र्यांचे दुर्लक्ष होत आहे. नगर पालिका या स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये मोडतात.शहराच्या विकासासाठी शासनातर्फे नगर पालिकांना वेगवेगळया मथळया खाली वेगवेगळा विकास निधी दिल्या जातो. जिल्हा वार्षिक योजना,वित्त आयोग,विशेष निधी,वैशिष्टपूर्ण योजना या योजनेतून मिळणा-या निधी मुळे नगर पालिका सबळ बनतात.शहराचा विकास केला जातो. मात्र, मूल नगर पालिकेला सन 2021-2022 मध्ये 22 मार्च 2022 रोजी एकदाच 15 वे वित्त आयोगाचा 23.74 लक्ष रूपये निधी मिळाला.त्यांनतर 2023 आणि 2024 सत्रासाठी निधीच मिळाला नाही.मागिल दोन वर्षापासून मूल नगर पालिका 15 वे वित्त आयोगाच्या निधी पासून वंचित आहे. निधी अभावी मूल नगर पालिकेची पाणी पुरवठा विभागाची,आरोग्य विभागाची आणि घनकच-याची कामे ठप्प झाली आहे.निधी नसल्याने घनकच-याची कामे रेंगाळली आहेत.तसेच पाणी पुरवठयाच्या दुरूस्तीवर सुदधा परिणाम होत आहे. पावसाळयाचे दिवस असल्याने शहरातील वातावरण शुदध राखण्यासाठी सुदधा निधीची चणचण भासू लागली आहे. 14 वे वित्त आयोगाचा निधी नगर पालिकेला व्यवस्थित मिळत होता.मात्र 15 वे वित्त आयोगाच्या निधीला कोणते ग्रहण लागले ?हा विषयी पालिका वर्तूळात चर्चा रंगत आहे.2020 मध्ये 15 वे वित्त आयोगाला सुरूवात झाली.एका वर्षात दोन वेळा या आयोगाचा निधी मिळण्याची तरतूद आहे.असे असतानाही कोणत्या कारणामुळे 15 वे वित्त आयोगाचा निधी थांबवून ठेवला असे अनुत्तरीत आहे. शहरातील पाणी पुरवठा सुरूळीत चालविण्यासाठी आणि त्यावरचा खर्च भागविण्यासाठी जनतेकडून नळ कर आकारला जातो.मूल नगर पालिकेची करापोटी 84.67 लक्ष रूप्यांची एकूण मागणी आहे. त्यापैकी फक्त 62.08 लाख रूप्ये वसूल झाल्याचे बोलल्या जाते. 25 टक्के पाणी पुरवठा कर अजूनही बाकी असल्याचे सांगण्यात येते.दुसरीकडे शासनाच्या निधी साठी वाट पाहावी लागत आहे. याकडे शासनाचे मोठी उदासिनता आणि दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.जिल्हयाचे पालकमंत्री यांचेही मूल नगर पालिकेकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
प्रतिक्रिया :- 15 वे वित्त आयोगाचा निधी नसल्याने पाणी पुरवठयाची कामे थांबली आहे.इलेक्ट्रिक बिल,जलसिंचनाचा किराया,देखभाल दुरूस्ती,नवीन पाईप लाईन टाकणे तसेच इतर नवीन कामे ठप्प झाली आहे. — श्रीकांत समर्थ,पाणी पुरवठा अभियंता,नगर परिषद,मूल