मूल :-सरकार आणि वनविभागाच्या उदासिन धोरणाविरोधात भूमिपुत्र ब्रिगेड तर्फे 13 सप्टेंबरला विविध मागण्यांसाठी मूल येथील तहसिल कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चाचे नेतृत्व डॉ.अभिलाषा गावतूरे करणार आहेत. मूल तालुक्यातील शेतकरी ,शेतमजूर,गुराखी आणि गावकरी वनविभागाच्या विविध समस्यांनी आणि वन्यजीवांच्या वाढत्या हल्यांनी बेजार झाला आहे.त्या समस्यांकडे शासन प्रशासन आणि वनविभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. शेतक-यांच्या न्याय हक्कासाठी मोर्चाचे आयोजन असल्याचे पत्रकार परिषदेत डॉ.अभिलाषा गावतूरे यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या , वाघांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे निष्पाप शेतकरी शेतमजूर आणि गुराख्याचे नाहक बळी चालले.एकटया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हयांमध्ये 70 टक्के वन आहे.त्यामुळे येथे वाघ बिबट सह इतर वन्यजीवाची मोठी संख्या वाढली.मानव वन्यजीव संघर्ष मूल तालुक्यात शिगेला पोहचला आहे.यावर वनविभागातर्फे कोणतीही उपाययोजना केल्या जात नाही.चराईचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे मूल तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.आधुनिक तत्रंज्ञानाचा वापर शेतक-यांच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी केलेला दिसत नाही.वाघांना कॉलर आयडी लावून संचार टॅ्रक करण्यात यावा,गावक-यांच्या सुरक्षेसाठी सायरन अलर्ट देण्यात यावे,मृतकाच्या कुटुंबीयांना पूर्ण पंचवीस लाख रूपये देण्यात यावे,गंभीर जखमी झालेल्या किंवा मृत पावलेल्या व्यक्तीच्या परिवारातील सदस्याला कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी,तसेच वाघाच्या हल्ल्यात बळी पडलेल्या मृताच्या कुटुंबियांना पूर्ण पंचवीस लाखाची रक्कम देण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात येणार आहे. यावेळी मूल येथील विश्राम गृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेला डॉ. अभिलाषा गावतूरे,डॉ.राकेश गावतूरे, अॅड.प्रशांत सोनूले
दीपक वाढई,जिल्हाध्यक्ष विजय मुसळे,नितेश मॅकलवार,विक्रम गुरनूले, राकेश मोहूर्ले, मनिष मोहूर्ले,देवाजी ध्यानबोईवार, सीमा लोनबले तथा कार्यकर्ते उपस्थित होते.
शेतकऱ्यांना हेल्मेट द्या :-
शेतक-यांच्या बाबतीत सरकार उदासिन धोरण राबवित आहे. सिंचनासाठी विहीर बांधकाम,सोलर पंप उपलब्ध करून देण्यात यावे.तसेच वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी शेतक-यांना हेल्मेट,मानपटटा, झटका स्टिक,स्पीकर उपलब्ध करून देणे महत्वाचे असताना वनविभाग असे कुठलेही धोरण राबविताना दिसत नाही,असे डॉ.अभिलाषा गावतूरे म्हणाल्या.