मूल येथून हरविलेली मुलगी आसाम राज्यात सापडली
सोशल मिडीयाच्या फ्रेन्ड रिक्वेस्टला पडली बळी
मूल:- मूल येथून हरविलेली मुलगी आसाम राज्यात सापडली.ती एका सोशल मिडीयाच्या फें्रन्ड रिक्वेस्टला बळी पडली. मूल पोलिसांनी सुखरूप आणि सुरूक्षितपणे तीला आईवडीलांच्या स्वाधीन केले.मोबाईल लोकेशन मुळे दोन आठवडयात मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. याप्रकरणी आसाम पोलिसांची त्यांना मदत लाभली.
चंद्रपूर येथील जानकीराम भोयर यांची साक्षी नावाची अठरा वर्षाची मुलगी मूल येथे आपल्या मोठी आई कडे राहून कर्मवीर महाविदयालयात बी.ए.प्रथम वर्षाचे शिक्षण घेत होती. 19 मार्च रोजी महाविदयालयात जाते म्हणून सकाळी ती घरून निघाली. रात्र होवूनही ती घरी परत न आल्याने कुटुंबीयांना चिंता वाटली. तिच्या वडीलाने मूल पोलिस ठाण्यात मुलगी हरविल्याची तक्रार नोंदविली.मूल शोध पत्रिका काढून शोध मोहिम सुरू केली. मूली कडे असलेल्या मोबाईल क्रमांका मुळे तिचे लोकेशन आसाम राज्यातील कचर येथील सापडले.जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्या परवानगीने मूल येथील एक पथक आसाम करिता रवाना झाले.आसाम पोलिसांच्या मदतीने मुलीला सुरूक्षित पणे ताब्यात घेण्यात आले. मूल येथे येवून साक्षीला तिच्या आईवडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. इन्स्टाग्राम,फेसबुक,स्नॅपचॉट,आयडी वरून आलेल्या अनोळखी चॅटींगला फ्रेन्ड रिक्वेस्टला ती बळी पडली. समोरच्या व्यक्तीने प्रेमाच्या जाळयात ओढून तिला लग्नाचे आमीष दाखविले.ब्लॅकमेल करण्यात आले.आत्महत्या करण्याची तसेच फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्यात येवून तिला आसाम येथे नेण्यात आले. आसाम पोलिसांच्या सहकार्याने आणि मूल पोलिसांच्या तत्परतेने पिडीत मुलीस मूल येथे येवून आईवडिलांच्या ताब्यात देण्यात आले.
मुलींनी फ्रेंन्ड रिक्वेस्टला बळी पडू नये असा संदेश देण्यात आला आहे. ही कारवाई प्रभारी अधिकारी प्रमोद चौगूले यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक सेलच्या सहकार्याने पार पाडण्यात आली.आईवडीलांपर्यंत सुखरूप पोहचलेल्या मुलीने मूल पोलिसांचे आभार मानले आहे.याप्रकरणी आसाम राज्यातील पोलिस अधिक्षक माहत्ता,अप्पर पोलिस अधिक्षक रंजित पॉल यांच्या मार्गदर्शनात उदरबांेंड पोलिस स्टेशनचे प्रभारी सी इंम सिम्स तिमूंग यांचे तसेच पथकाचे विशेष सहकार्य लाभले. मूल येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी ,पोलीस उपनिरीक्षक वर्षा नैताम,पोलीस हवालदार भोजराज मुंडरे, संदीप चुधरी यांनी विशेष कामगिरी बजावली.
काही प्रश्न अनुत्तरीत:- सोशल मिडीयाच्या फें्रन्ड रिक्वेस्टला बळी पडलेली साक्षी कोणाच्या माध्यमातून आसाम पर्यंत पोहचली. या प्रकरणी कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आली नाही.आरोपी कुठले आहेत.याचा उहापोह पोलिसांच्या प्रेसनोट मध्ये करण्यात आलेला नाही.
सोशल मिडीयाच्या फ्रेन्ड रिक्वेस्टला पडली बळी
मूल:- मूल येथून हरविलेली मुलगी आसाम राज्यात सापडली.ती एका सोशल मिडीयाच्या फें्रन्ड रिक्वेस्टला बळी पडली. मूल पोलिसांनी सुखरूप आणि सुरूक्षितपणे तीला आईवडीलांच्या स्वाधीन केले.मोबाईल लोकेशन मुळे दोन आठवडयात मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. याप्रकरणी आसाम पोलिसांची त्यांना मदत लाभली.
चंद्रपूर येथील जानकीराम भोयर यांची साक्षी नावाची अठरा वर्षाची मुलगी मूल येथे आपल्या मोठी आई कडे राहून कर्मवीर महाविदयालयात बी.ए.प्रथम वर्षाचे शिक्षण घेत होती. 19 मार्च रोजी महाविदयालयात जाते म्हणून सकाळी ती घरून निघाली. रात्र होवूनही ती घरी परत न आल्याने कुटुंबीयांना चिंता वाटली. तिच्या वडीलाने मूल पोलिस ठाण्यात मुलगी हरविल्याची तक्रार नोंदविली.मूल शोध पत्रिका काढून शोध मोहिम सुरू केली. मूली कडे असलेल्या मोबाईल क्रमांका मुळे तिचे लोकेशन आसाम राज्यातील कचर येथील सापडले.जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्या परवानगीने मूल येथील एक पथक आसाम करिता रवाना झाले.आसाम पोलिसांच्या मदतीने मुलीला सुरूक्षित पणे ताब्यात घेण्यात आले. मूल येथे येवून साक्षीला तिच्या आईवडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. इन्स्टाग्राम,फेसबुक,स्नॅपचॉट,आयडी वरून आलेल्या अनोळखी चॅटींगला फ्रेन्ड रिक्वेस्टला ती बळी पडली. समोरच्या व्यक्तीने प्रेमाच्या जाळयात ओढून तिला लग्नाचे आमीष दाखविले.ब्लॅकमेल करण्यात आले.आत्महत्या करण्याची तसेच फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्यात येवून तिला आसाम येथे नेण्यात आले. आसाम पोलिसांच्या सहकार्याने आणि मूल पोलिसांच्या तत्परतेने पिडीत मुलीस मूल येथे येवून आईवडिलांच्या ताब्यात देण्यात आले.
मुलींनी फ्रेंन्ड रिक्वेस्टला बळी पडू नये असा संदेश देण्यात आला आहे. ही कारवाई प्रभारी अधिकारी प्रमोद चौगूले यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक सेलच्या सहकार्याने पार पाडण्यात आली.आईवडीलांपर्यंत सुखरूप पोहचलेल्या मुलीने मूल पोलिसांचे आभार मानले आहे.याप्रकरणी आसाम राज्यातील पोलिस अधिक्षक माहत्ता,अप्पर पोलिस अधिक्षक रंजित पॉल यांच्या मार्गदर्शनात उदरबांेंड पोलिस स्टेशनचे प्रभारी सी इंम सिम्स तिमूंग यांचे तसेच पथकाचे विशेष सहकार्य लाभले. मूल येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी ,पोलीस उपनिरीक्षक वर्षा नैताम,पोलीस हवालदार भोजराज मुंडरे, संदीप चुधरी यांनी विशेष कामगिरी बजावली.
काही प्रश्न अनुत्तरीत:- सोशल मिडीयाच्या फें्रन्ड रिक्वेस्टला बळी पडलेली साक्षी कोणाच्या माध्यमातून आसाम पर्यंत पोहचली. या प्रकरणी कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आली नाही.आरोपी कुठले आहेत.याचा उहापोह पोलिसांच्या प्रेसनोट मध्ये करण्यात आलेला नाही.