निधीचा फटका – तलाठी कार्यालय बांधकामास झटका
निधी अभावी मूल तालुक्यातील 28 नवीन तलाठी कार्यालयाचे बांधकाम रखडले
मूल:- विनायक रेकलवार
शासनाकडून निधी प्राप्त न झाल्याने मूल तालुक्यातील 28 नवीन तलाठी कार्यालयाचे बांधकाम मागिल दीड वर्षांपासून रखडले आहे. ब-याच इमारतीचे बांधकाम अर्धवट झाले आहे. निधीच नसल्याने कत्रांटदारानी हात वर केले आहे. शासनाच्या महत्वाकांक्षी लाडकी बहिण योजनेचा फटका बसल्याचे बोलल्या जाते. चंद्रपूर जिल्हयात 52 नवीन तलाठी कार्यालय मंजूर झाले. त्यापैकी एकटया मूल तालुक्यात 28 नवीन तलाठी कार्यालय मंजूर झाली आहे. माजी पालकमंत्री आणि विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष प्रयत्नामुळे 18 कोटी 19 लक्ष 24 हजार रूपयंाची प्रशासकीय मान्यता मिळाली. याबाबत महसूल आणि वनविभागाने 17 ऑक्टोबर 2023 रोजी एक शासन निर्णय निर्गमित केला. कर्मचा-यांच्या निवासस्थानासह तलाठी कार्यालयाची निर्मिती असा आराखडा आहे. गावामध्ये प्रशासकीय कामकाज उत्तमरित्या चालावे,गावातील नागरिकांना आवश्यक असलेले महत्वाचे दाखले,कृषीविषयक नोंदी,कागदपत्रे वेळेत मिळावीत हा नवीन तलाठी बांधकामा मागचा उददेश आहे. मात्र , या महत्वाकांक्षी उददेशालाच निधी प्राप्त न झाल्याचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे मूल तालुक्यातील मरेगाव,भादूर्णी,उश्राळाचक,केळझर,राजगड,पिपरी दिक्षित,भेजगाव,चिंचाळा,सुशी दाबगाव,ताडाळा,नांदगाव,मूल,राजोली,नवेगाव,कोसंबी,कांतापेठ,चिरोली,गडीसूर्ला,बांेडाळा भूज,मारोडा,चिखली माल,चिमढा,हळदी गावगन्ना,बोरचांदली,सिंताळा,जुनासूर्ला,बेलघाटा माल, आणि डोंगरगाव येथील नवीन तलाठी कार्यालयाचे बांधकाम निधी अभावी अर्धवट स्थितीत आहेत. कंत्राटदारांची बिले अडल्याने त्यांनी आता हात वर केले आहे. जवळपास बांधकाम करणा-या सर्वच कत्रांटदाराची दहा लक्ष रूपये गुंतून असल्याचे बोलल्या जाते. शासनाकडून निधीच प्राप्त झाला नसल्याने अपूर्ण अवस्थेतील बांधकामे याची साक्ष देत आहेत. निधीच नसल्याने बांधकाम पूर्ण कशी करायची असा कत्रंाटदारांचा प्रश्न आहे. या बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे देखरेख आहे. निधीच नसल्याने ही बांधकामे रखडल्याचे बांधकाम विभागाचे म्हणणे आहे. तलाठी हा राज्य शासनाचा महत्वाचा घटक आहे.गाव पातळीवरील प्रशासनाचा हा मुख्य कणा आहे.सातबारा वाटप करणे,ई पीक पाहणी,गावाची पैसेवारी निश्चित करणे, वारसान नोंदी यासह विविध महत्वाची कामे तलाठी यांना पार पाडावी लागतात. या मुख्य उददेशालाच हरताळ फासल्या गेला आहे. जिल्हयात हिच अवस्था असल्याचे समजते.
यात पोंभूर्णा तालुक्यात 11 ,चंद्रपूर तालुक्यात 6 ,बल्लारपूर तालुक्यात 7 आणि मूल तालुक्यात 28 असे 52 नवीन तलाठी कार्यालय बांधकामाचा तपशिल आहे.
निधी अभावी मूल तालुक्यातील 28 नवीन तलाठी कार्यालयाचे बांधकाम रखडले
मूल:- विनायक रेकलवार
शासनाकडून निधी प्राप्त न झाल्याने मूल तालुक्यातील 28 नवीन तलाठी कार्यालयाचे बांधकाम मागिल दीड वर्षांपासून रखडले आहे. ब-याच इमारतीचे बांधकाम अर्धवट झाले आहे. निधीच नसल्याने कत्रांटदारानी हात वर केले आहे. शासनाच्या महत्वाकांक्षी लाडकी बहिण योजनेचा फटका बसल्याचे बोलल्या जाते. चंद्रपूर जिल्हयात 52 नवीन तलाठी कार्यालय मंजूर झाले. त्यापैकी एकटया मूल तालुक्यात 28 नवीन तलाठी कार्यालय मंजूर झाली आहे. माजी पालकमंत्री आणि विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष प्रयत्नामुळे 18 कोटी 19 लक्ष 24 हजार रूपयंाची प्रशासकीय मान्यता मिळाली. याबाबत महसूल आणि वनविभागाने 17 ऑक्टोबर 2023 रोजी एक शासन निर्णय निर्गमित केला. कर्मचा-यांच्या निवासस्थानासह तलाठी कार्यालयाची निर्मिती असा आराखडा आहे. गावामध्ये प्रशासकीय कामकाज उत्तमरित्या चालावे,गावातील नागरिकांना आवश्यक असलेले महत्वाचे दाखले,कृषीविषयक नोंदी,कागदपत्रे वेळेत मिळावीत हा नवीन तलाठी बांधकामा मागचा उददेश आहे. मात्र , या महत्वाकांक्षी उददेशालाच निधी प्राप्त न झाल्याचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे मूल तालुक्यातील मरेगाव,भादूर्णी,उश्राळाचक,केळझर,राजगड,पिपरी दिक्षित,भेजगाव,चिंचाळा,सुशी दाबगाव,ताडाळा,नांदगाव,मूल,राजोली,नवेगाव,कोसंबी,कांतापेठ,चिरोली,गडीसूर्ला,बांेडाळा भूज,मारोडा,चिखली माल,चिमढा,हळदी गावगन्ना,बोरचांदली,सिंताळा,जुनासूर्ला,बेलघाटा माल, आणि डोंगरगाव येथील नवीन तलाठी कार्यालयाचे बांधकाम निधी अभावी अर्धवट स्थितीत आहेत. कंत्राटदारांची बिले अडल्याने त्यांनी आता हात वर केले आहे. जवळपास बांधकाम करणा-या सर्वच कत्रांटदाराची दहा लक्ष रूपये गुंतून असल्याचे बोलल्या जाते. शासनाकडून निधीच प्राप्त झाला नसल्याने अपूर्ण अवस्थेतील बांधकामे याची साक्ष देत आहेत. निधीच नसल्याने बांधकाम पूर्ण कशी करायची असा कत्रंाटदारांचा प्रश्न आहे. या बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे देखरेख आहे. निधीच नसल्याने ही बांधकामे रखडल्याचे बांधकाम विभागाचे म्हणणे आहे. तलाठी हा राज्य शासनाचा महत्वाचा घटक आहे.गाव पातळीवरील प्रशासनाचा हा मुख्य कणा आहे.सातबारा वाटप करणे,ई पीक पाहणी,गावाची पैसेवारी निश्चित करणे, वारसान नोंदी यासह विविध महत्वाची कामे तलाठी यांना पार पाडावी लागतात. या मुख्य उददेशालाच हरताळ फासल्या गेला आहे. जिल्हयात हिच अवस्था असल्याचे समजते.
यात पोंभूर्णा तालुक्यात 11 ,चंद्रपूर तालुक्यात 6 ,बल्लारपूर तालुक्यात 7 आणि मूल तालुक्यात 28 असे 52 नवीन तलाठी कार्यालय बांधकामाचा तपशिल आहे.