कविवर्य अजय राऊत उत्कृष्ट कवी पुरस्काराने सन्मानित

129

कविवर्य अजय राऊत उत्कृष्ट कवी पुरस्काराने सन्मानित

कवठी – 

नाट्यश्री साहित्य मंच शाखा गडचिरोलीच्या वतीने मागील वर्षात पार पडलेल्या आठवड्याचे उत्कृष्ट कवी सत्रात आठवड्यातील उत्कृष्ट कवी म्हणून सावली तालुक्यातील कवठी या गावचे कविवर्य अजय दशरथ राऊत यांची निवड करण्यात आली होती. त्यानुसार नाट्यश्री साहित्य कला मंच चे सर्वेसर्वा लेखक, नाटककार चुडाराम बल्हारपुरे आयोजित पुरस्कार सोहळा तसेच “जत्रा घडली नागोबाची”या नाट्य पुस्तकाचा प्रकाशन सोहळा तसेच काव्यसंमेलन पार पडला या भव्य कार्यक्रमाच्या आयोजित पुरस्कार सोहळ्यात कविवर्य अजय राऊत यांना उत्कृष्ट कवी पुरस्कार नाट्यश्रीच्या मंचावर उपस्थित मान्यवर डॉ. बळवंत भोयर प्रसिद्ध साहित्यिक रंगकर्मी तथा समीक्षक नागपूर, प्रा. श्याम मोहरकर प्रसिद्ध साहित्यिक, रंगकर्मी तथा समीक्षक चंद्रपूर, पांडुरंग सोनवणे पोलीस उप अधीक्षक, साहित्यिक तथा रंगकर्मी नागपूर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.या प्रसंगी पार पडलेल्या सोहळ्यात कवीवर्य अजय राऊत यांना पुस्तक आणि प्रमाणपत्र देऊन पुरस्काराने सन्मानित करण्यात आला.या पुरस्काराबद्दल आप्तजन साहित्यिक,झाडीपट्टी कलावंत, मित्रपरिवारासह गाववासीकडून अभिनंदाचा वर्षाव होत आहे.